"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

रोही पंचाक्षरी


            ( कार्यशाळा)

            

♦️काव्यप्रकार : "रोही पंचाक्षरी "

    दिनांक: ११/६/२०२१

    (६/१०/२०२० पण शिकविले होते)

    

    विषय: स्पर्श

    

♦️नियम✍️


       🔸"रोही पंचाक्षरी" या काव्यप्रकारात प्रत्येक ओळीत पाच वर्ण/अक्षरे असतात. हा एक चारोळीचाच प्रकार आहे.. परंतु चारोळीचे नियम ह्या काव्यप्रकाराला लागू पडत नाहीत..ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे..हे सदैव ध्यानात ठेवावे..

       🔸यमक: पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधणे यामध्ये फारच आवश्यक आहे.

       🔸अंत्यपूर्व स्वरयमक साधावे. ( उदा.गीता, सीता,माया,छाया,काया, काम,धाम, निष्काम,घाम वगेरे..)

       🔸 तीसरी ओळ- ह्या काव्यप्रकारात तीसऱ्या ओळीला जास्त महत्त्व दिले आहे..ही ओळ विषयाला *समर्पक* पाहिजे..

       *समर्पक* म्हणजे अनुरूप विषय,आशय महत्त्व समुपदेशन पाहून लिहावे.*

         

उदा.

(१)

स्पर्श


हा वात्सल्याचा 

स्पर्श आईचा

अनुभव हा

स्वर्ग सुखाचा


(२)


देखणी परी

स्वप्न सुंदरी

सुंदर राणी

हि सोनं परी


(३)


मन रमले

मन फुलले

चारोळी मुळें

मन हर्षले


सौ.सुधा जाधव


     *आपल्या लक्षात आता आले असेलच कि,तीसरी ओळ किती महत्त्वपूर्ण आहे.* त्याला पूरक अशीच चौथी ओळ घ्यावी. परंतु ह्या चारही ओळी  एकमेकांना पूरक.. अर्थपूर्ण असाव्यात.

     

धन्यवाद 🙏


सौ.सुधा जाधव

कोल्हापूर.


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁